महत्वाच्या घडामोडी

लग्नास नकार दिल्याने तरुणाने संपवलं महिलेचं जीवन, पाहा काय घडलं…

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावड्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे.. लग्नास नकार दिल्याने तरुणाने एका महिलेचा गळा चिरून खून केल्याची घटना घडली आहे.. कविता जाधव असे या मृत महिलेचे नाव आहे..

कविता जाधव यांच्या पतीचे चार वर्षापूर्वी निधन झाले होते.. त्यानंतर त्यांची राकेश संपकाळ यांच्याशी चांगली ओळख झाली.. या ओळखीतून राकेश यांनी कविता जाधव यांच्या मागे माझ्याशी लग्न कर असा तगादा लावला होता.. मात्र, कविता यांना तीन मुले असल्यामुळे त्यांनी लग्नास नकार दिला.. कविता यांनी लग्नासाठी नकार दिल्याने राकेश यांना राग आला, आणि याच रागातून राकेश यांनी कविता या महिलेचा कोयत्याने गळा चिरून खून केला आहे.. त्यानंतर राकेश याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *