क्राईम

धक्कादायक ! पत्नीने व मुलाने मिळून संपवले पतीचे जीवन…

प्रतिनिधी / दिल्ली

श्रद्धा वालकर खून प्रकरणासारखीच एक धक्कादायक घटना दिल्ली येथ्वे घडली आहे.. या घटनेने दिल्लीत खळबळ उडाली आहे.. पोलिसांना दिल्ली येथील पांडव नगरच्या रामलीला मैदानातून मानवी शरीराचे तुकडे सतत मिळत होते.. मात्र हे तुकडे कुठून येताहेत हेच पोलिसांना कळत नव्हते..

गुन्हे शाखेने हे प्रकरण हातात घेतल्यानंतर या घटनेचा कसून तपास सुरु करण्यात आला.. मात्र पोलिसांना ५ महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर या प्रकरणाचा तपास करण्यात यश आले आहे.. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रामलीला मैदानात सापडलेला मृतदेह हा अंजन दास याचा असल्याचे सांगितले आहे..

अंजन दास हा बिहारचा रहिवासी होता.. अंजनची पत्नी पूनम आणि मुलगा दीपक यांनी ही हत्या केल्याचे समोर आले आहे.. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंजनची मुलगा दीपक याच्या पत्नीवर आणि बहिणीवर वाईट नजर होती.. त्यामुळे मुलगा दीपक आणि पत्नी पूनम यांनी अंजनच्या हत्येचा कट रचला होता..

अंजनला सुरवातीला औषध देण्यात आले आणि नंतर त्याचा गळा चिरून हत्या करण्यात आली.. हत्या केल्यानंतर अंजनच्या मृतदेहाचे १० तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवण्यात आले.. श्रद्धा हत्या प्रकरणाप्रमाणेच पत्नी पूनम आणि मुलगा दीपक रोज रात्री अंजनच्या मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी जात होते..

सुरवातीला पोलिसांना रामलीला मैदानातून सापडलेल्या मृतदेहाच्या तुकड्यावरून मृतदेहाची ओळख पटू शकली नाही.. त्यानंतर पोलिसांच्या गुन्हे शाखेने शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजवरून मृत अंजन दासची ओळख पटली..

मात्र ओळख पटल्यानंतरही त्याची पुष्टी होऊ शकली नाही.. अंजनची अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांना असे समजले की, तो ४ ते ५ महिन्यांपासून बेपत्ता असून त्याची तक्रारही पोलिसात नोंदवण्यात आली नव्हती.. याबाबत पोलिसांनी अंजनची पत्नी आणि मुलगा यांच्याशी संपर्क साधला..

पूनम आणि दीपक या दोघांनीही सुरवातीला पोलिसांची दिशाभूल केली परंतु कडक चौकशी केली असता या दोघांनीही आपला गुन्हा काबुल केला आहे.. पूनमने अंजनसोबत दुसरे लग्न केले होते.. पूनमला अंजनच्या पहिल्या लग्नाची आणि कुटुंबाची माहिती नव्हती.. अंजनची पहिली पत्नी आणि मुले हे कुटुंब बिहारमध्ये राहत होते..

अंजन हा उदरनिर्वाहासाठी कोणतेच काम करत नव्हता.. त्यामुळे तो पूर्णपणे पूनमवर अवलंबून होता.. इतकेच नाही तर अंजनने काही दिवसांपूर्वी पूनमचे दागिने विकून बिहारमध्ये आपल्या पहिल्या कुटुंबाला पैसे पाठवले होते.. त्यामुळे पूनम आणि अंजन यांच्यामध्ये भांडण होत होते..काही दिवसानंतर पूनमचा मुलगा दीपक याचे लग्न झाले.. पूनमला आपली मुलगी आणि दीपकच्या पत्नीवर अंजनची घाणेरडी नजर असल्याचा संशय होता.. या कारणावरून पूनम आणि मुलगा दीपक यांनी अंजनचा खून केला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *