महत्वाच्या घडामोडी

व्यास नारायण झोपडपट्टीत शिरले पाणी..दिवाळीच्या तोंडावर लोकांचे हाल…

प्रतिनिधी / एबी मराठी न्यूज नेटवर्क

परतीच्या पाऊसाने सगळीकडे जोरदार हजेरी लावली आहे.. उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये म्हणजेच प्रामुख्याने पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने उजनी धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे..

याचाच परिणाम म्हणून पंढरपूर येथील व्यास नारायण झोपडपट्टी येथील घरांमध्ये व परिसरात पाणी शिरण्यास सुरवात झाली आहे.. एन दिवाळीच्या तोंडावर लोकांना आपलं घर सोडावं लागत आहे.. रायगड भवन मध्ये त्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे..

गेल्या काही महिन्यांपासून पाऊस कमी जास्त प्रमाणात पडत असल्यामुळे पाणी पातळी ही कमी जास्त प्रमाणात होताना दिसत आहे.. या आधीही अनेकवेळा पाणी झोपडपट्ट्यांमध्ये शिरल्याचे पाहायला मिळाले आहे.. सातत्याने कराव्या लागत असलेल्या स्थलांतरामुळे नागरिक त्रस्त झालेले दिसून येत आहेत..

येथील रहिवाश्यांनी एबी मराठीशी बोलताना पाहा काय दिल्या आहेत प्रतिक्रिया..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *