महत्वाच्या घडामोडी

भीषण अपघात, २५ वारकऱ्यांना घेऊन जाणार वाहन पलटी…

प्रतिनिधी / पुणे

शिंदवणे घाटात वारकऱ्यांची एक पिकअप गाडी पलटी होऊन अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. या अपघातात १५ वारकरी जखमी झाले आहेत.. हे वारकरी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील आहेत.. या अपघातात तीन वारकरी गंभीर जखमी झाले असून २० हून अधिक वारकरी किरकोळ जखमी झाले आहेत..

हे वारकरी पिकअप गाडीतून देवदर्शनासाठी आले होते.. दिवसभर पंढरपूर, जेजुरी येथील दर्शन करून नंतर ते पिकअप गाडीतून देवाची आळंदी या ठिकाणी देवदर्शनासाठी निघाले होते.. शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील घाटामध्ये तीव्र उतारावर ब्रेक न लागल्याने चालकाचे पिकअप वरील ताबा सुटला आणि हा अपघात झाला आहे.. पिकअप मध्ये एकून २५ वारकरी असल्याची माहिती समोर आली आहे.. जखमी वारकऱ्यांना उरळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे.. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *