महत्वाच्या घडामोडी

लग्नाला घरच्यांचा विरोध असल्याने प्रेमीयुगुलांनी केलं असं काही…

प्रतिनिधी / नागपूर

लग्नाला घरच्यांचा विरोध असल्यामुळे एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे.. ही धक्कादायक घटना रामटेक तालुक्यातील रयतवाडी येथे घडली आहे.. अश्विनी रामेश्वर उईके ( वय – २२ ) आणि अरुण सुखदेव कोडवाते ( वय – २२ ) अशी या दोघांची नावे आहेत.. अरुण कोडवाते हा फुलझरी येथे गवंडी काम करतो..

दोन वर्षांपूर्वी त्याची आणि अश्विनीची ओळख झाली.. आणि कालांतराने ती दोघं एकमेकांच्या प्रेमात पडली.. ९ सप्टेंबर या दिवशी दोघेही रयतवाडी येथे आले.. दुसऱ्या दिवशी अश्विनीचे दोन भाऊ तिला भेटण्यासाठी रयतवाडी येथे आले.. आणि अश्विनीला त्यांनी घरी चलण्यास सांगितले, आम्ही दोघांचे विधिवत लग्नही लावून देतो, असेही ते म्हणाले परंतु अश्विनी भावांचे ऐकून घेण्यास तयार नव्हती..

अश्विनीचे भाऊ रागाने निघून गेल्यानंतर अश्विनी व अरुण यांच्यात वाद झाला.. आणि दोघांनीही घरी उंदीर मारण्यासाठी आणलेले औषध प्राशन केले.. त्या दोघांच्या तोंडून फेस येत असल्याचे अरुणच्या आईच्या लक्ष्यात येताच तिने आरडाओरडा केला.. शेजारच्यांनी त्या दोघांनाही देवलापारच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.. मात्र दोघांची प्रकृती गंभीर असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मेडिकलमध्ये हलविण्यातस सांगितले.. सोमवारी अश्विनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अरुणची प्रकृती चिंताजनक आहे.. अधिक तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मी घोडके करीत आहेत.. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *