भीषण अपघातात दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत…
प्रतिनिधी / परभणी
परभणी जिल्ह्यात सेलू तालुक्यात एका भीषण अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे.. येथे एका भरधाव टेम्पोची आणि दुचाकीची जोरदार धडक झाली आहे.. या अपघातात दुचाकीवरील असणाऱ्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे..
बालाजी भारत गायकवाड ( वय -२३) आणि भाऊसाहेब महादेव सागडे ( वय – २२) अशी या मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत.. हे तरुण सेलू तालुक्यातील लाडनांद्रा गावातील रहिवासी आहे.. हे दोघेही काही कामानिमित्त दुचाकीवरून जात होते..
पाथरी रोडवरील पान्हेरा पाटीजवळ असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एका टेम्पोने या तरुणांच्या दुचाकीला दोरदार धडक दिली.. आणि या धडकेत या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे..
अपघातानंतर टेम्पो चालकाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तेथील स्थानिक नागरिकांनी या टेम्पोचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.. या अपघातात दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे गावात शोककळा पसरली असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे..