दळण आणायला गेल्यावर दोन सख्या भावांचा मृत्यू , तेरा वर्षांपूर्वी वडिलांचाही झाला होता मृत्यू…
प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सुर्ली येथे एका भीषण अपघातात दोन सख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. विठ्ठल अतुल कदम ( वय – १६ ) आणि त्याचा लहान भाऊ रणजीत अतुल कदम ( वय – १४ ) अशी या मृत पावलेल्या भावंडांची नावे आहेत..
विठ्ठल व त्याचा भाऊ रणजीत हे दोघे दळण घेऊन दुचाकीवरून घरी जाण्यासाठी निघाले होते.. परंतु वाटेत एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.. या अपघातात दोघेही भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.. या दोन सख्या भावंडांच्या मृत्यूने कदम कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.. परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे..