महत्वाच्या घडामोडी

शेततळ्यात पडलेली कंपासपेटी काढताना घडलं असं काही.. सख्या भावंडांनी गमावले प्राण…

प्रतिनिधी / औरंगाबाद

घराजवळ असणाऱ्या शेतातील शेततळ्यात कंपास काढण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना औरंगाबाद तालुक्यातील दरकवाडी या गावात घडली आहे.. अजिंक्य धनंजय वाघ (वय – ११ ) व पार्थ धनंजय वाघ (वय -९ ) अशी या मृत पावलेल्या भावंडांची नावे आहेत..

धनंजय वाघ यांची गावाशेजारी शेती असून ते सहकुटुंब शेतातच राहतात.. नेहमीप्रमाणे अजिंक्य आणि पार्थ घराशेजारी खेळत असताना, खेळता खेळता ते शेजारी असणाऱ्या शेततळ्याकडे गेले असता कंपासपेटी पाण्यात पडली.. आणि ती कंपासपेटी काढण्यासाठी दोघेही पाण्यात उतरले.. यावेळी त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.. या घटनेची करमाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे..

सगळीकडे गौरी – गणपतीची लगबग सुरु असल्याने ही घटना कधी व कशी घडली हे लवकर कोणाला कळलेच नाही.. बराच वेळ झाला तरी मुलांचा आवाज नाही ते दिसत नाहीत हे आईच्या लक्ष्यात येताच तिने मुलांच्या वडिलांना विचारले.. मात्र त्यांनाही काही माहित नसल्याने सगळीकडे शोधाशोध सुरु झाली.. यावेळी शेततळ्यात अजिंक्यचा मृतदेह तरंगत असताना आढळून आला.. आणखी शोधाशोध केली असता पार्थचाही मृतदेह सापडला.. वाघ दाम्पत्यांना ही दोनच मुले होती.. ही मन हेलावून टाकणारी घटना घडल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *