युरिया लिंकींग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा – स्वभिमानी” ची कृषीमंत्र्यांकडे मागणी…
प्रतिनिधी / मुंबई
राज्यभरात रासायनिक खते व बी – बियाणे यांची टंचाई होत आहे, त्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे.. याच प्रश्नाबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी आज कृषीमंत्र्यांची भेट घेतली आहे.
या भेटीचे कारण म्हणजे, राज्यातील शेतकऱ्यांना खत दुकानदारांकडून वेळेवरखत युरिया मिळत नाही, युरिया कमी प्रमाणात दिला जातो, युरिया घ्यायचा असेल तर सोबतच इतर खते बळजबरीने खरेदी करण्यासाठी दुकानदार त्यांना भाग पाडत आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांचे विनाकारण जास्तीचे पैसे खर्च होतात.. विशेष म्हणजे या युरिया लिंकींगच्या साखळीमध्ये कृषीविभागाचे अधिकारी देखील सामील आहेत.. त्यामुळेच युरिया लिंकींग हे लोन सर्वत्र पसरले आहे. हे सर्व प्रश्न बागल यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निदर्शनास आणुन दिले..
![](https://www.abmarathi.in/wp-content/uploads/2022/08/IMG-20220826-WA0017-461x1024.jpg)
युरिया खत लिंकींगमुळे सध्या शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यात खते मिळत नाहीत, पिकांच्या फळधारणा कालावधीतच जर खते मिळाली नाहीत तर, राज्यातील शेतकऱ्यांनाचे उत्पादन घटेल व त्यामुळे त्यांच्या होणाऱ्या नुकसानाकडे बागल यांनी कृषीमंत्री सत्तार यांचे लक्ष वेधले.. तसेच सध्या पावसाळा सुरु आहे, अतिवृष्टीमुळे विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जी मदत मिळणार आहे, ती पुरेशी नाही त्यामध्ये वाढ करावी व एकही शेतकरी वंचित न ठेवता अतिवृष्टीग्रस्त भागातील सरसकट शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्यांना मदत करावी, अशी ही मागणी बागल यांनी कृषीमंत्री सत्तार यांच्याकडे केली..