सामाजिक

समतेचे प्रेरक साने गुरुजी स्मारकाचे लोकार्पण…

प्रतिनिधी / पंढरपूर

साने गुरुजींनी पंढरपूरमधील श्री विठ्ठल मंदिर समतेच्या विचाराने दलितांना खुले करण्यासाठी प्राणांतिक उपोषण करून वारकरी संप्रदायाचा समतेचा विचार पुढे नेला.. या समतेच्या लढ्याला ७५ वर्षे पूर्ण झाली याचे स्मरण म्हणून ह. भ. प. तनपुरे महाराज मठात स्मारक उभारण्यात आल्याचे वै. श्री तनपुरे महाराज ट्रस्ट चे अध्यक्ष ह. भ. प. बद्रीनाथ तनपुरे महाराज व सानेगुरुजी सत्याग्रह समितीचे अध्यक्ष श्री. राजाभाऊ अवसक हे पत्रकार परिषदे मध्ये माहिती देत आहेत..

थोर स्वातंत्र सेनानी श्री साने गुरुजी श्री विठ्ठल मंदिर प्रवेश सत्याग्रह स्मारक लोकार्पण सोहळा व वै. श्री संत तनपुरे बाबा यांच्या ३७ वा पुण्यस्मरण सोहळा दिनांक ०८ / ११ / २०२२ रोजी मा. खा. श्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आमदार बबन दादा शिंदे व ह. भ. प. बद्रीनाथ तनपुरे महाराज हे स्वागताध्यक्ष असणार आहेत..

वै. श्री. संत तनपुरे बाबा ३७ वा पुण्यतिथी सोहळा व संत सेनानी साने गुरुजी सत्याग्रह स्मारक लोकार्पण सोहळा दि. ०७ / ११ / २०२२ ते ०८ / ११ / २०२२ दरम्यान साजरा केला जाणार आहे.. सोहळ्यासाठी वै. श्री संत तनपुरे बाबा यांच्या दगडवाडी ( जि. रत्नागिरी ) येथून विश्व एकात्मता दिंडी व पालघड ( जि. रत्नागिरी ) या साने गुरुजी यांच्या जन्म गावापासून समता दिंडी या दिनांक ०७ / ११ / २०२२ रोजी पंढरपुरात दुपारी ०३ : ०० वाजता एकत्रित येणार आहेत..

वारकरी संप्रदाय समतेची परंपरा रुजवत असताना पंढरीचा पांडुरंग दलितांसाठी खुला नव्हता.. त्यासाठी साने गुरुजींनी ०१ मे ते १० मे १९४७ या कालावधीत श्री संत कुशाबा तनपुरे महाराज यांच्या मठात प्राणांतिक उपोषण केले.. या संघर्षातून श्री संत चोखा मेळा यांच्या पुण्यतिथी दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची दारे सर्वांसाठी कायमची खुली करून उपोषणाची सांगता करण्यात आली.. तसेच वै. श्री संत तनपुरे बाबांनी ‘भारत जोडो’ अभियानांतर्गत चारोधाम १२ ज्योतिर्लिंग संपूर्ण भारताची पद यात्रा करून संत विचार व वारकरी संप्रदायाचा प्रसार केला.. तसेच श्री क्षेत्र पंढरपूर येथे भुकेलेल्यांना अन्नदान सेवाकार्य आणि भारतीय स्वातंत्र याचा अमृत मोहोत्सव साजरा होत आहे.. या संस्मरणीय घटनेचे औचित्य साधून श्री संत तनपुरे महाराज चारोधाम मंडप ट्रस्ट आणि संत सेनानी साने गुरुजी सत्याग्रह स्मारक समिती हा सोहळा साजरा करीत आहे..

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ह. भ. प. बद्रीनाथ तनपुरे महाराज अध्यक्ष व सर्व विश्वस्त श्री तनपुरे महाराज चारोधाम मंडप ट्रस्ट पंढरपूर व साने गुरुजी सत्याग्रह स्मारक समिती पंढरपुरचे चे अध्यक्ष राजाभाऊ अवसक, कार्याध्यक्ष श्री. ह. भ. प. अनंत महाराज तनपुरे, सचिव श्री दादासाहेब रोंगे, सदस्य निशिकांत परचंडराव, शिवाजी शिंदे सर, अशोक क्षीरसागर, सारंग कोळी, महादेव ( तात्या ) कोळी, शिवाजी शिंदे, कोंडलकर, उपेंद्र तन्नु, नागेश अवताडे, दत्ता तोडकरी, ज्ञानेश्वर बंडगर, इत्यादी मान्यवरांनी समस्त जनतेला सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *