महत्वाच्या घडामोडी

नदीच्या मधोमध लागली चितेला आग, पाहा नक्की काय घडलं…

प्रतिनिधी / औरंगाबाद

कन्नड तालुक्यातील आमदाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.. येथे एका नदीपात्रात धगधगत्या चितेला पुराच्या पाण्याने वेढल्याची घटना घडली आहे.. आमदाबाद येथे एका महिलेचे निधन झाले होते..

आमदाबाद येथे स्वतंत्र स्मशानभूमी नाही.. या गावाशेजारील असलेल्या अंजना नदीच्या पात्रालगतच मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात.. नातेवाईकांसह ग्रामस्थांनी नदीपात्रातील उंच जागेवर या महिलेचे अंत्यसंस्कार केले..

चितेला अग्नी दिल्यानंतर काही क्षणातच अंजना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि या धगधगत्या चितेला पुराने वेढले.. या चितेला पुराच्या पाण्याने वेढल्यामुळे नातेवाईक आणि ग्रामस्थांची अस्वस्थता वाढली.. परंतु मोठ्या शर्थीने प्रयत्न करून हा मृतदेह जाळण्यात आला आहे.. या घटनेने सर्वांना धक्का बसला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *