महत्वाच्या घडामोडी

पंढरपुरात मुसळधार पाऊस ! गावांचा संपर्क तुटला…

प्रतिनिधी / पंढरपूर

ईश्वर वठार गावाला जोडणाऱ्या जिल्हा मार्ग क्रमांक २९ या मार्गावरील ओढ्यावर पाणी असल्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे.. ईश्वर वठार बिटरगाव हा जिल्हा मार्ग असून या मार्गावरून बिटरगाव, अजनसोंड, सुस्ते, मुंडेवाडी, लोकांना ये जा करावी लागते..

ईश्वर वठार गावाच्या जवळ एक ओढा आहे.. या ओढ्याची उंची कमी असल्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून हा पूल पाण्याखाली गेला आहे.. शाळेला जाणारी लहान मुलं, गरोदर माता भगिनी यांना नेआण करणे मोठे जिकीरीचे झाले आहे..

माढा मतदार संघाचे आमदार गेल्या अनेक वर्षापासून या पुलाची उंची वाढवण्यासाठी निधी देणार असल्याचे आश्वासन नेहमी देतात.. व मतदान झाल्यानंतर याकडे लक्ष देत नाहीत.. म्हणून बबन दादा शिंदे यांचा जाहीर निषेध करून त्यांना या भागात फिरू देणार नसल्याचे भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर यांनी सांगितले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *