धक्कादायक ! मुलीचे लग्न उद्यावर येऊन ठेपले.. मात्र आदल्या दिवशीच वडिलांचे छत्र हरपले…
प्रतिनिधी / गिर सोमनाथ
लग्न समारंभ म्हटले की उत्साह हा आलाच.. आणि त्यातून जर मुलीचे लग्न असेल तर तो क्षण वडिलांच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा व भावूक असतो.. मुलीचे लग्न म्हणले की वडिलांचा उत्साह काही औरच असतो.. मात्र गिर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावळ येथे एक हृदय हेलावणारी घटना घडली आहे..
गिर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावळ येथील रहिवासी रघुवंशी व्यापारी अशोक यांची मुलगी आयुषी हिचे लग्न होते.. आपल्या लाडक्या मुलीचे लग्न असल्यामुळे अशोक यांनी मुलीच्या विवाहाची जोरदार तयारी सुरु केली होती..
आयुषी ही अहमदाबाद येथे एका खाजगी कंपनीत नोकरी करते.. अशोक हे आपल्या मुलीच्या लग्नासाठी खूप उत्साहात होते.. मात्र लग्नाच्या एक दिवस अगोदर अचानक अशोक हे आजारी पडले.. त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास होत होता..
अशोक यांना तातडीने राजकोटमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.. मात्र उपचारादरम्यान अशोक यांचा दुर्दैवी अंत झाला.. अशोक हे खूप दिवसांपासून आपल्या मुलीच्या लग्नाची तयारी करत होते..
परंतु लग्नाच्या आदल्या दिवशी काळाने त्यांच्यावर घाला घातला.. वडिलांच्या अकस्मात निधनाने मुलगी आयुषी हिला खूप मोठा धक्का बसला आहे.. अशोक यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे..