आईसोबत कपडे धुण्यासाठी गेल्या ३ चिमुकल्या आणि घडलं असं काही…
प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील बिळुर येथे एक भयंकर धक्कादायक घटना घडली आहे.. बिळुर येथे आईसह तीन मुलींचा तलावात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.. सुनिता माळी ( वय – ३० ) असे आईचे नाव असून, अमृता माळी ( वय – १३ ) , अश्विनी माळी ( वय – १० ) आणि ऐश्वर्या माळी ( वय – ७ ) अशी मृत्यू झालेल्या तीन मुलींची नावे आहेत..
सुनिता माळी या आपल्या मुलींसह कपडे धुण्यासाठी बिळुर येथे तलाव परिसरात गेल्या होत्या.. त्यानंतर रात्री उशिरा या चौघींचेही मृतदेह तलावाच्या पाण्यात आढळून आले.. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता, माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.. हा प्रकार अपघात आहे का घातपात याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.. या घटनेने गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे..