महत्वाच्या घडामोडी

समाधान दादा ! डोळ्यावरचा काळा गॉगल काढून शेतकऱ्यांकडे पण पहा…

एबी मराठी न्यूज नेटवर्क

गेल्या पंधरा दिवसापासून राज्यात परतीच्या पावसाने हैदोस घातला आहे.. त्यामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत.. राज्यात अनेक ठिकाणी पिकांचे पंचनामे पूर्ण होत आले, मात्र पंढरपूर मंगळवेढा आणि मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात प्रशासन दिरंगाई करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील यांनी केला आहे..

पंढरपूर नांगळवेढ्यातील शेतकरी ओल्या दुष्काळाने होरपळत असताना येथील लोकप्रतिनिधी समाधान आवताडे मात्र काळा गॉगल घालून लंडनच्या वाऱ्या करत आहेत, त्यांनी जरा डोळ्यावरचा काळा गॉगल काढून शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पहावी, असा सल्लाही पाटील यांनी आवताडेंना दिला आहे..

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *