वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपवले जीवन ….पहा नक्की काय घडल ?
प्रतिनिधी /धाराशिव
धाराशिव येथील रहिवासी असलेल्या गीता कदम या विद्यार्थिनीने नांदेड येथील गोविन्दसिंघजी कॉलेज च्या होस्टेल मध्ये जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे .गीता ही नांदेड येथील महाविद्यालयात इंजीनीरिंग चे शिक्षण घेत होती .गीता दोन दिवसापासून कॉलेज ला आली नसल्यामुळे चौकशी केली असता होस्टेल मध्ये तिचा मृतदेह आढळून आला
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली .गीता ने रात्री ११ च्या सुमारास बंद खोलीत आपले जीवन संपवले असे पोलीस तपासामध्ये स्पष्ट झाले आहे .घटना स्थळी पोलिसांना गीताने चिट्ठी लिहलेली सापडली आहे .
गीताने तिच्या बरोबर शिकत असलेल्या मित्राच्या त्रासला कंटाळून हे टोकाचं पाउल उचलले असावे असे तिने लिहलेल्या वरून आढळून आले आहे .तिने महिला आयोगाच्या नावाने ही चिठ्ठी लीहली आहे .या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत .