दोन निष्पाप मुलांच्या आईने संपवले आपले जीवन…
प्रतिनिधी / राजकोट
‘ संसार म्हणल की भांड्याला भांड लागणारच ‘ हे वाक्य तुम्ही बरेचदा ऐकल किंवा वाचल असेल.. नवरा – बायकोमध्ये अनेकवेळा भांडणं होतात आणि ते लवकर मिटतातही, पण कधी – कधी ही भांडण इतकी टोकाला जातात आणि नको ते घडून बसतं.. नवरा – बायकोच्या या भांडणात कधी नवरा तर कधी बायको आपले आयुष्य संपवून टाकताना आपल्याला दिसते.
राजकोटमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे , ज्यात पतीच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने आपले जीवन संपवले आहे.. राजकोट शहरातील राया रोडवरील दर्शन पार्कमध्ये राहणाऱ्या मित्तल योगेश साकारिया (वय -३५ ) या विवाहितेने आपल्या राहत्या घरात फास घेतला आहे. त्यांचे १६ वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्यांना एक मुलगा व एक मुलगी असा परिवारही आहे.
मित्तल यांचे पती मेटोडा येथे फ्राईम्स कारखाना चालवतात. आपल्या मुलीने आयुष्य संपवल्याचे कळताच मित्तल यांचे वडील रतिलाल कपुरिया यांनी राजकोटला धाव घेतली आणि पोलिसात तक्रार दिली असून, माझी मुलगी मित्तल ही कालावाड येथे माझ्या घरी आली असता तिचा पती योगेश याने घरात येऊन तिला बेदम मारहाण केली आणि गेल्या तीन वर्षांपासून योगेश तिच्यावर अत्याचार करत असल्याचेही कपुरिया यांनी सांगितले.
मित्तल यांचे वडील रतिलाल यांच्या तक्रारीवरून गांधीग्राम पोलिसांनी कारवाई केली आहे. मित्तल यांच्या वडिलांच्या विनंतीनुसार पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मित्तल यांच्या मृतदेहाचे फॉरेन्सिक पोस्टमार्टम केले. रतिलाल यांच्या जबाबानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे..