महत्वाच्या घडामोडी

लग्नाआधी नवरीने ठेवलेली अट ऐकून तुम्हालाही धक्का बसेल…

प्रतिनिधी / मध्य प्रदेश

आपण पाहतो की आजकाल रोज कुठून ना कुठून तरी लग्न मोडल्याच्या बातम्या समोर येत असतात.. लग्न मोडण्याची करणेही अनेक असतात.. मध्य प्रदेशातून असेच एक लग्न मोडण्याचे कारण समोर येत आहे ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल..

मध्य प्रदेशात राहणारी प्रियंका भदोरिया हिचे लग्न रवी चौहान याच्याशी ठरले आहे.. परंतु प्रियंकाने लग्नाच्या अगोदर सासरच्या लोकांसमोर एक अट ठेवली आहे.. ती अट ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वच लोक आश्चर्यचकित झाले आहेत..

प्रियंकाने सांगितले आहे की, जोपर्यंत सासरचे लोक १०, ००० रोपे लावत नाहीत तोपर्यंत मी लग्न करणार नाही.. सुरवातीला प्रियंकाची ही अट ऐकून सासरच्या मंडळीना थोडे विचित्र वाटले, पण नंतर त्यांनी प्रियंकाची ही अट मान्य केली आहे..

प्रियंकाला लहानपणापासूनच झाडे लावण्याची खूप आवड होती.. त्यामुळे तिने लग्नाच्या वेळेस १०, ००० झाडे लावण्याची इच्छा व्यक्त केली आहे.. प्रियंकाच्या या सामाजिक विचाराने तिचा होणारा पतीही प्रभावित झाला आहे.. नाहीतर आजकाल मुलींना दागिने आणि कपडे यांची इच्छा खूप असते..

प्रियंकाच्या मागणीवरून ५००० रोपे तिच्या माहेरी आणि ५००० रोपे तिच्या सासरी लावण्यात येणार आहेत.. अट मान्य झाल्यावरच हा विवाह सोहळा पुढे गेला आणि लग्न थाटामाटात पार पडले आहे.. सध्याच्या काळात प्रियंकासारख्या विचार करणाऱ्या लोकांची गरज आहे.. तिच्या या विचाराने सर्वत्र तिचे कौतुक होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *