महत्वाच्या घडामोडी

पती-पत्नीने एकत्रित संपवले जीवन..कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल…

प्रतिनिधी / सातारा

आजच्या विज्ञानाच्या युगात अनेक गोष्टी शक्य होतात, आणि अनेक अडचणींवर मातही करता येते.. परंतु, याच विज्ञानाच्या युगात सातारा जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे.. आपल्याला मुल होत नाही या दुःखात एका दांपत्याने टोकाचे पाऊल उचलले आहे.. तानाजी राजपुरे आणि पुजा राजपुरे असे या पती – पत्नीची नावे आहेत..

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कणूर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.. तानाजी राजपुरे आणि त्यांची पत्नी पूजा हे दोघेही अनेक दिवसांपासून आपल्याला मूल व्हावे यासाठी प्रयत्न करत होते.. लग्नाला दहा वर्षे होऊनही मूल होत नसल्याने त्यांनी वैद्यकीय उपचारही सुरु केले होते, मात्र त्यालाही यश आले नाही.. अखेर दोघांनाही हे दुःख सहन न झाल्याने त्यांनी आपल्या राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे.. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *