महत्वाच्या घडामोडी

देवीचं विसर्जन करत असताना अचानक आला नदीला पूर, पाहा काय घडलं…

प्रतिनिधी / पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमधील जलपायगुडी जिल्ह्यात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. काल रात्री देवीचं विसर्जन करण्यासाठी माल नदीच्या काठावर लोकं जमली असताना नदीला अचानक पूर आला आणि त्यात अनेक लोकं वाहून गेली.. ही घटना एका कॅमेऱ्यात कैद झाली आहे..

या घटनेची माहिती मिळताच बचावकार्याला सुरवात झाली असून सात मृतदेह हाती लागले आहेत.. इतरांचा शोध अद्यापही सुरु आहे.. या घटनेने राज्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.. परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *