कर्जाला कंटाळून पती-पत्नीने संपवले जीवन…
प्रतिनिधी / उस्मानाबाद
सतत होणाऱ्या वादाला कंटाळून पती- पत्नीने आत्महत्या केली आहे. कर्ज फेडण्यासाठी त्यांनी जमीन विकली होती. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद व्हायचा आणि या वादाला कंटाळून दोघांनी टोकाचं पाऊल उचललं. कळंब तालुक्यात नायगावमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यांनी राहत्या घरात एकाच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे..
प्रकाश वसंत दीक्षित (वय- ३० ) व अश्विनी प्रकाश दीक्षित (वय- २७ ) अशी दोघा पती-पत्नीची नावे आहेत. सोमवारी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
त्यांच्या पश्चात आई, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी शिरढोण पोलीस स्टेशनला आतापर्यंत कोणी तक्रार दिली नसल्यामुळे गुन्हा दाखल झालेला नाही. दीक्षित कुटुंब ८ दिवसांपूर्वीच पुण्यावरून नायगावला राहायला आले होते..