महत्वाच्या घडामोडी

भीमेला पुराचा धोका ! तीन धरणातून १ लाख विसर्ग भीमा नदीत येणार.. प्रशासनाकडून अति सतर्कतेचा ईशारा…

प्रतिनिधी / एबी मराठी न्यूज नेटवर्क

पुणे शहरासह भीमा व नीरा नदीच्या खोऱ्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी व वीर धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठी वाढ करण्यात आली आहे त्यामुळे भीमा नदीकाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून आज सकाळी 11 वाजता उजनीतून भीमा नदीत 50 हजार क्युसेक पाणी सोडलं जात आहे तर वीर धरणातून 26 हजार हजार क्युसेक पाणी नीरा नदीत पाणी सोडलं जात आहे

नाजरे धरण क्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रात काल मुसळधार पाऊस झाल्याने नाजरे धरण 100% भरले असून नाजरे धरणातून कऱ्हा नदीत 35200 क्युसेक पाणी सोडलं जात आहे हे पाणी नीरा नदीत येऊन मिसळते त्यामुळे नीरा नदीत एकूण 60000 क्युसेकचा विसर्ग येणार आहे. तसेच उजनी मधून येणारा 50 हजार असा संगम मधून एकूण 1लाख 10   हजार क्युसेक  पाणी भीमा नदीत येणार असल्याने भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली जाणारा असून जुना दगडी पूल ही पाण्याखाली जाणार आहे त्यामुळे प्रशासनाने भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *