वीरचा विसर्ग बंद, उजनी विसर्ग जैसे थे, भीमेकाठी पूरस्थिती…
प्रतिनिधी / एबी मराठी न्यूज नेटवर्क
उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये काल संध्याकाळी ६०,००० क्यूसेक ने पाणी सोडलं जातं होतं.. आज सकाळी ७ वाजताही उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये ६०,००० क्युसेकचा विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे..
दौंड येथून उजनीमध्ये ३५,५४४ क्युसेक पाणी येत आहे.. मात्र काल वीर धरणातून सोडण्यात आलेला २६,००० क्युसेकचा नीरा नदीपात्रातील विसर्ग बंद करण्यात आलेला असून, वीर धरणाच्या सांडाव्यातून नीरा नदीपात्रामध्ये सोडलेला विसर्ग पूर्णपणे बंद केला आहे..
वीर धरणामधून नीरा नदीपात्रात फक्त वीजनिर्मितीसाठी ३००० क्युसेकचा विसर्ग आज सकाळी ७ वाजता सोडला जातो आहे.. मात्र काल उजनी धरणातून सोडलेला ६०,००० क्युसेक, तसेच वीरचा २६,००० व नाझरा धरणातून सोडलेला ३५,००० क्युसेक असा ०१ लाख क्युसेकपेक्षा जास्त पाणी हे भीमा नदीपात्रामध्ये आल्यानं आत्ता भिमेवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत..
मात्र वीर धरणातील विसर्ग आज सकाळी ७ वाजता नीरा नदीपात्रात पूर्णपणे बंद केलेला असल्यामुळे भीमेकाठी थोडासा दिलासा मिळणार आहे..