शेतकरी

भीमा नदीकाठच्या गावांना थोडासा दिलासा ! वीर धरणातला विसर्ग झाला कमी

वीर आणि उजनी धरणातून गेल्या तीन दिवसांपासून सोडल्या जात असलेल्या विसर्गामुळे भीमाकाठी पूरस्थिती निर्माण झाली आहे.. मात्र आज नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी असून वीर धरणातुन सोडण्यात येत असलेला विसर्ग रात्री 11 वाजता कमी करण्यात आला आहे.. 

काल उजनीमधून 61 हजार 600 तर विरमधून काल सकाळी 33 हजार 600 एवढा विसर्ग सुरू होता.. मात्र वीर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग रात्री दहा वाजता कमी करण्यात आला असून 24 हजार 300 करण्यात आला होता, आणि रात्रीच 11 वाजता त्यामध्ये आणखी घट करण्यात आली असून विरमधून रात्री 11 वाजता 15 हजार क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे..

त्यामुळे आता नदीकाठी थोडासा दिलासा मिळणार आहे.. 

आज सकाळी 6 वाजता उजनीमधून 61 हजार 600 क्यूसेक चा विसर्ग सुरू आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *