भीमेचा पूर ओसरणार ! उजनी व वीर धरणातील विसर्ग केले कमी
गेली चार दिवस उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे भीमा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली होती.. मात्र नदीकाठच्या लोकांना आता दिलासादायक बातमी आहे..
कारण उजनी आणि वीर या दोन्ही धरणातून येणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे..
उजणीतून काल 60 हजार क्यूसेकचा विसर्ग कायम होता, मात्र रात्री 10 वाजता तो कमी करून 50 हजार क्यूसेक करण्यात आला असून आज सकाळी 6 वाजता सुद्धा 50 हजार क्यूसेकचा विसर्ग भीमापात्रात सुरू आहे..
तर वीर धरणाचा वीसर्गही कमी करण्यात आला असून काल 33 हजार क्यूसेकचा असणारा विसर्ग आज सकाळी 15 हजार करण्यात आला आहे..
त्यामुळे संगम येथे भीमा नदीपात्रात एकूण 65 हजार क्यूसेकचा विसर्ग येतो आहे..
त्यामुळे आता भीमा नदीची पाण्याची पातळी कमी होणार असून पाण्याखाली गेलेले अनेक बंधारे मोकळे होणार आहेत..