पेनूर जवळ भीषण अपघात,पंढरपुरातील तीन युवक जागीच ठार
पंढरपूर प्रतिनिधी
मोहोळ पंढरपूर मार्गावर पेनूर गावाजवळ कार आणि खाजगी बस चा भीषण अपघात झाला .हा अपघात इतका भीषण होता की यात पंढरपूर मधील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे .मिळालेल्या माहितीनुसार हे युवक पंढरपूर शहरातील विजापूर गल्लीत राहत होते .
हे तीन युवक मोहोळ वरून पंढरपूर ला येत असताना चुकीच्या दिशेने आलेल्या खाजगी बस ने कारला समोरून जोराची धडक दिली यामध्ये ऋषिकेश साखरे वय २५ ,सुरज कदम वय २८ ,प्रशांत शेटे वय ४० यांच्या जागीच मृत्यू झालाय
ही घटना शुक्रवारी रात्री आकराच्या सुमारास घडली या दुर्घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र शोककळा पसरली आहे
![](https://www.abmarathi.in/wp-content/uploads/2022/11/Screenshot_20221112-120201_Chrome-1-1024x972.jpg)