महत्वाच्या घडामोडी

अपघातात पत्नी आणि दोन मुलींचा मृत्यू , पतीचा हृदय हेलावणारा आक्रोश…

प्रतिनिधी /

“माझे घर बंद होते. आता घरात पाऊल टाकलं तर खूप रिकाम रिकाम वाटतं. माझा संसार गेला होता , आता माझ्या मागे कोणी नाही. पत्नी वीणा आणि मी २५ वर्षे एकत्र होतो आम्ही एकत्र अनेक स्वप्ने पहिली होती. कितीतरी आठवणी होत्या, काय सांगू ? मोठ्या मुलीला इंजिनियर होऊन परदेशात जायचे होते, तर धाकटी मुलगी जिया ही माझ्या काळजाचा तुकडा होती. हे सांगताना विपुल यांचे डोळे भरून आले होते.

विपुल सांगतात की, मी माझी धाकटी मुलगी जिया हिला कॅडबरी दिली आणि रिक्षाचालक यासिनभाईला मसाला दिला. आणि माझ्या पत्नीला घराची चावी देऊन मी माझ्या बाईकवर तारापुरला निघालो आणि ते घराकडे निघाले. माझ्या कुटुंबासोबतची ही माझी शेवटची भेट ठरेल हे मला माहित नव्हते.

एका मद्दधुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीने रिक्षा आणि दुचाकीला धडक दिली. विपुल यांच्या पत्नी वीणाबेन, मुलगी जान्हवी आणि जिया यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय या अपघातात रिक्षाचालक यासिनभाईसह एकून सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात संपूर्ण मिस्त्री कुटुंब उध्वस्त झाले होते. एकाच घरातून तीन सदस्यांचा मृत्यू झाल्याने गावामध्ये खळबळ माजली होती आणि उपस्थित असलेल्या सर्वांचे डोळे पाणावले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *