भिमेची पूरस्थिती ओसरतेय, दोन्ही धरणांमधून विसर्ग केले कमी
उजनी आणि वीर धरणांमधून भीमा नदीत सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती.. मात्र आता दोन्ही धरणातील विसर्ग कमी केल्याने पूरस्थिती हळूहळू ओसरत असताना दिसत आहे. त्यामुळे पंढरपूर परिसरातील पाण्याखाली गेलेले अनेक बंधारे मोकळे होत आहेत..
आज सकाळी सात वाजता उजनी धरणातून ४० हजार क्युसेकचा विसर्ग चालू आहे.. तर वीर धरणातून १४ हजार क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. उजनीमध्ये दौंड कडून येणारा पाणीसाठाही आता कमी होतो आहे. उजनी धरणाची टक्केवारीही आता घटली असून ती ९८.३४ टक्के एवढी झाली आहे.
पूरस्थिती कमी झाल्याने आता नदीकाठच्या गावांना आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळतो आहे..