हृदयद्रावक ! दोन्ही मुलीचं झाल्याने रागाच्या भरात पतीने केलं असं काही…
प्रतिनिधी / जळगाव
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव या शहरात एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीला दोन्ही मुलीचं झाल्या, याचा राग डोक्यात ठेऊन पत्नीचा खून केला आहे आणि नंतर स्वतः आत्महत्या केली आहे.. सुरज दिलीप कुऱ्हाडे ( वय – २८ ) व रेश्मा सुरज कुऱ्हाडे असे या मृत पती – पत्नीची नावे आहेत..
धुळे जिल्ह्यातील जुनोने येथील रेश्मा हिचा विवाह चाळीसगाव शहरात राहणाऱ्या सुरज याच्याशी तीन वर्षांपूर्वी झाला होता.. सुरज पत्नी व मुलींसह चाळीसगाव शहरातील करगाव रोडवरील जय गणेश नगर येथे राहत होता.. सुरज हा मातीकाम करून आपला व कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होता..
लग्नानंतर आपल्याला पहिला मुलगा व्हावा अशी सुरजची इच्छा होती.. परंतु त्याला पहिली मुलगी झाली.. मुलगी झाल्यावर सुरज नाराज झाला होता.. सुरज याला दारूचे व्यसन असल्यामुळे सुरज हा मुलगी झाल्याच्या कारणावरून रोज पत्नी रेश्मा हिच्याशी भांडण करत होता..
त्यानंतर दुसऱ्या बाळंतपणासाठी रेश्मा चार महिन्यांपूर्वी माहेरी गेली होती.. दुसऱ्यांदाही रेश्माला मुलगीच झाली.. काही दिवसानंतर रेश्मा सासरी चाळीसगाव येथे आपल्या घरी परतली.. त्यानंतर दोन दिवस उलटल्यावर सुरज याने दोन्ही मुलीचं झाल्या या कारणावरून रेश्मा हिच्याशी वाद घातला.. त्यानंतर रागाच्या भरात सुरजने रेश्माच्या डोक्यात कुऱ्हाड मारून तिचा खून केला.. आणि घरातून निघून गेला..
खून केल्यानंतर धुळे रेल्वे लाईनवर स्वतः रेल्वेखाली झोकून आत्महत्या केली आहे.. रेश्मा हिच्या नातेवाईकांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.. पुढील तपास पोलीस करत आहेत.. या घटनेत पती आणि पत्नी या दोघांचाही जीव गेला असून दोन्ही मुलींच्या डोक्यावरचे आई – वडिलांचे छत्र हरपले आहे.. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..