राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा ! अजित पवार यांची मागणी…
प्रतिनिधी / मुंबई
राज्यभरात मुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थितीमुळे शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे.. पूर्ण खरीप पिकांचे नुकसान झाले आहे, तसेच रब्बीचा हंगामसुद्धा धोक्यात आला आहे.. त्यामुळे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे..
अजित पवार यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांसंबंधीही पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे.. यावेळी ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबतही पवार यांनी निवेदन सादर केले आहे..
“कर्नाटक राज्यात कृष्णा नदीवर अलमट्टी धरण बांधल्यापासून कृष्णा नदीपात्राच्या पाण्यात फुगवटा निर्माण होऊन नदीकाठच्या गावात पाणी घुसते.. त्यामुळे मोठे नुकसान होते.. अलमट्टी धरणाची उंची वाढविणे संयुक्तिक होणार नाही..” असेही अजित पवार म्हणाले आहेत..