उजनीताला विसर्ग वाढवला, तर वीर धरणातील विसर्ग मंदावला
एबी मराठी न्यूज नेटवर्क
काल पुणे शहरासह भीमा नदीच्या खोऱ्यात झालेल्या पावसामुळे उजनीमध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढत असून आज दुपारी उजनी धरणात दौंड येथून ४५ हजार क्युसेकने पाणी येत असल्याने आज दुपारपासून उजनीतून भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यात वाढ करण्यात आली आहे.. आज दुपारी चार वाजता उजनीतून भीमा नदी पात्रामध्ये ६० हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे.. मात्र वीर आणि कऱ्हा नदीमध्ये नाझर धरणातून सोडण्यात येणारं पाणी कमी करण्यात आलं असून वीर मधून आज सकाळी सोडण्यात आलेला २६ हजार क्युसेकचा विसर्ग कमी करून तो १६ हजार क्युसेक करण्यात आला आहे..
तर कऱ्हा नदीमध्ये नाझरा धरणातून सोडण्यात आलेला ३५ हजार क्युसेकचा विसर्ग कमी करून तो १५ हजार एवढा करण्यात आला आहे..
मात्र काल पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनीत वरून येणाऱ्या पाण्यात मोठी वाढ होत असल्याने आता उजनिताला भीमेत येणारा विसर्ग वाढवला आहे..
भीमा नदीत आता संगम पासून एकूण ९० हजार क्युसेकचा विसर्ग सुरु असल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..