अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणावर काळाचा घाला, धावताना नेमक काय घडल ?
प्रतिनिधी \औरंगाबाद
केद्र सरकारने अग्निवीर सैन्य भरतीची घोषणा केल्यानंतर देशातील तरुण या संधीच सोनं करण्यासाठी खूप काबाडकष्ट करतात. या भरतीत तरुण मुलं आपल्या जीवाची बाजी लावत मैदानी चाचणीसाठी तयारी करत असतात. मात्र, या भरतीत १६०० मीटर धावण्याची चाचणी देत असताना एका तरुणाला अचानक चक्कर आली आणि तो खाली कोसळला.
त्यानंतर त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. करण नामदेव पवार ( वय -२० ) असं त्या तरुणाच नाव आहे. तो कन्नड तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील रहिवासी आहे अशी माहिती समोर आली आहे.
करण हा तरुण भारतीय सैन्य दलाच्या भरतीसाठी औरंगाबादला आला होता. त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.