विरार मध्ये दहावीच्या मुलीचा भयानकरित्या मृत्यू
प्रतिनिधी \ विरार
कोणाला कधी व कसा मृत्यू येईल याचा काही नेम नाही. विरार मध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या एका विध्यार्थिनीचा भयानकरित्या मृत्यू झाला आहे. क्लास वरून घरी येताना तिच्या घराच्या खालीच विजेचा शॉक लागून या मुलीचा मृत्यू झाला आहे. या मुलीच्या मृत्यूला MSEB चा गलथन कारभार जबाबदार असल्याचा आरोप तेथील नागरिकांनी केला आहे.
तनिष्का लक्ष्मण कांबळे ( वय – १५ ) रा. विरार असे मृत मुलीचे नाव आहे. विरार पश्चिमेकडिल मथुरा नगर परिसरात ती क्लासला जाते. मागील दोन दिवसापासून विरार मध्ये रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे सोसायटीच्या समोर रस्त्यावर पाणी साचले होते. या पाण्यात विद्युत केबल ब्रेक झाली होती. त्या केबल मधून पाण्यात विजेचा प्रवाह चालू होता. त्याच पाण्यातून जाताना तानिष्काला विजेचा शॉक लागला व तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
विशेष म्हणजे तिच्या घराच्या खालीच ही घटना घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तनिष्कच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचे वृत्त विरार शहरामध्ये पसरले आहे. यामुळे विरार शहरात एकच भीतीचे वातावरण पसरले आहे.